वणी विभागातील होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्याची अवैध विक्री करणारे रॅकेटच परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम उत्खननाचा हा गोरखधंदा मागील काही वर्षापासून सर्रास व राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीची हाणी होत आहे. तसेच सरकारला मिळणारा महसुल बुडत आहे. वागदरा (नविन), मोहदा, रासा, वांजरी अश्या ठिकाणी वणी विभागातील अनेकगावात मागील काही वर्षापासून मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरु आहे.

याबाबत संबंधीत विभाकडे अनेकदा संभाजी ब्रिगेड व त्या परिसरातील नागरीकांनी तक्रारी केल्या परंतु सबंधीत अधिकारी व कर्मचारी अवैद्य उत्खनन व वाहतुक करण्यास जाणिवपुर्वक साहाय केल्यामुळे Willful and persistant negligence of डयुटी कर्त्यव्यात जाणिवपुर्वक व सतत कसुर करणे, Incompetence अकार्यक्षमपणा दाखवतात. परिनामी नैसर्गिक टेकड्या व सरकारी ई वर्ग जमिनी पोखरून जेसीबी मशीनने परमीशन नसतांना सुद्धा ५० फुट खोली पर्यंत उत्खनन केले आहे.

या सर्व प्रकाराला महसुल, आर.टी.ओ., वाहतुक व पोलीस प्रशासनाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. या तस्करीतून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या खिशात जातो. यामुळे संबधीत विभागात कोणी लेखी किंवा मौखिक तक्रार केल्यास तात्पुरती कार्यवाही करून हजारो ब्रास अवैद्य मुरूमाचे उत्खनन आढळून आल्यास केवळ २५ ते ५० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आल्याची नोंद केल्या जाते. ही थातुरमातूर कारवाही न करता सदर उत्खननाचे निरीक्षण जबाबदार आधिकारी व गावातील लोकप्रतिनीधी याच्या समक्ष इ.टि.एस. मशिनद्वारे
मोजमाप व मुल्याकंन करून, ‘महाराष्ट्र जमिन महसुल सहिता १९६६ कलम ४८ (७)’ नुसार, गौनखणिजाचा बाजारभाव मुल्याच्या पाच पट दंड आकरण्यात यावा व ‘कलम ४८ (८)’ नुसार उत्खननामध्ये उपसन्यासाठी साधनसामग्री आढळली आहे ती जप्त करण्यात यावी.
या सर्व प्रकाराला पाठबळ देणाऱ्या संबंधीत विभागातील अधीकारी व कर्मच्याऱ्यांवर योग्य ती कारवाही करावी. अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात या सर्व प्रकारावर आळा घालण्यात आला नाही किंवा कारवाही करण्यात आली नाही तर आपणही या सर्व प्रकाराला पाठिंबा देत असल्याचे समजून संभाजी ब्रिगेड च्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून यातून उद्भवणाऱ्या शांतता आणि सुव्यवस्थेला आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, करिता निवेदन सादर केले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, ॲड. अमोल टोंगे, खालील शेख, दत्ता डोहे, आशिष रिंगोले व इतर नागरिक उपस्थित होते.




